whistle blowers.....

Whistle blowers ......

सत्येन्द्र  दुबे, शंमुघन  मंजुनाथ आणि सतीश शेट्टी ही नावे आज स्वतंत्र भारतात भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या बरोबरीनेचा घेतली जावीत. देशाला पोखरत असलेल्या भ्रष्टचाराशी ह्यांनी दोन हात केले आणि परिणामत : त्यातूनच  त्यांची हत्या करण्यात आली.

सत्येन्द्र  दुबे यांनी  IIT कानपूर  येथून B.Tech civil engineering , Banaras Hindu University मधून  M.Tech आणि IES ला पात्र झाल्यानंतर National Highways Authority of India (NHAI) येथे काम करू लागले. तेथे सत्येद्र यांनी पंतप्रधान वाजपेयींच स्वप्न असलेल्या  'सुवर्ण चतुष्कोण' मधे चाललेल्या भ्रष्टचारावर पायबंद घालायचा प्रयत्न केला. अर्थातच त्यांना धमक्या येऊ लागल्या, त्याला  सत्येन्द्र यांनी भीख घातली नाही. प्रकल्पामधे चालू असलेल्या भ्रष्टचाराबद्दल त्यांनी पंतप्रधानांना  पत्र लिहीले. पण ते पत्र चुकीच्या हातामध्ये पडले आणि सत्येन्द्र दुबे ह्यांच्यावर काळ ओढवला. २७ नोव्हेबर २००३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली.... 

शंमुघन  मंजुनाथ यांनी computer sci.engineering  केल्यानंतर IIM Luknow येथून MBA केलं होतं.  IIM मधे मिळ्नाऱ्या भल्या मोठ्या पगाराच्या  नोकऱ्या सोडुन त्यांनी Indian Oil Corporation (IOC) या सरकारी कंपनीत नोकरी पत्करली होती. पेट्रोल पम्पांवर होत असलेल्या  भेसळीवर त्यांनी अंकुश आणायला सुरुवात केली. काही पेट्रोल पम्पांवर कारवाई केली. धमक्या येत असताना आपल्या तत्वांना मुरड न घालता त्यांनी कारवाई चालूच ठेवली. त्यातच मंजुनाथ यांचा २१ नोव्हेबर २००५ रोजी बळी गेला...

सतीश शेट्टी हे RTI (Right to Information Act ) activist . महाराष्ट्रामधे पुणे - मुंबई परिसरात होणारे अनेक जमीन  घोटाळे त्यांनी उघड्कीस आणले होते. धमक्या ही त्यांच्यासाठी नित्याचीच बाब झाली होती. त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही झाले, पण ते झुकले नाहीत. त्यांची  १३. जानेवारी २०१० हत्या करण्यात आली....

IIT , IIM  मधून मिळणऱ्या भरमसाठ  पगाराना लाथ मारून सार्वजनिक व्यवस्था (so called 'system') सुधारण्याचा प्रयत्न करणारे सत्येन्द्र , मंजुनाथ आणि सामाजिक कार्यासाठी वाहून  घेण्यासाठी स्वत: लग्न न करणारे सतीश यांच्या आत्म्यामधे कोणती ज्योत पेटत असेल...? येता जाता 'sytem' ला दोष देणारे आपण किती  क्षुद्र आहोत याची जाणीव होऊ लागते. 

मंजुनाथ  IIM मधे असताना त्याच्या सरांना विचारत असे....."Sir, What's Life, if you have nothing to Die for....? "  

Updated : 29July 2010

कुमार  केतकर  लोकसत्ता  अग्रलेख

Updated 10August 2010

संसदेत whistle blower act होणार....

Hindu : http://www.thehindu.com/news/national/article560731.ece

Economics Times : http://economictimes.indiatimes.com/news/politics/nation/Cabinet-clears-whistleblower-protection-bill/articleshow/6285308.cms

सकाळ : http://72.78.249.124/esakal/20100810/5187302013286539564.htm


 


 

Comments

  1. सत्येन्द्र दुबे, शंमुघन मंजुनाथ आणि सतीश शेट्टी यांना प्रथम सलाम ..........
    हे वाचल्यावर मला एक dialog आठवला ........
    If you want to change the system as per your style ....first be a part of that system.......and go till that level where you are the boss

    ReplyDelete
  2. lekh chan aahe, pan eth ya jagat asa vichar karanare bharpurjan bhettil pan vel ali na mag saglech tya system cha part bantat ani mag kay tech bhrashtacharachi reee pudhe odhtat, ya deshach kahi honar nahi he asach chalayach garib garibch hot janar ani shrimant shrimantach hot janar .......
    jaude

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सी. एस. टी.

मी आणि माझी साधना ....

Union Budget